News
मुंबई : तुम्ही एखादी मालमत्ता खरेदी केली असेल आणि तहसीलदार कार्यालयात नोंदणी केल्यानंतर तुम्ही निवांत बसला असाल की दुकान, जमीन किंवा घर आता तुमच्या मालकीचं झालं आहे तर तुम्ही एक मोठी चूक करत आहात. विक्रेत्याला पूर्ण रक्कम देऊन आणि नोंदणी करूनही तुम्हाला मालमत्तेची संपूर्ण मालकी मिळू शकत नाही.
नोंदणी करूनही तुम्हाला मालमत्तेची मालकी नाही मिळणार
आपलं घर घ्यायचं प्रत्येकाचं स्वप्न असतं आणि लोक घरखरेदी किंवा घर बांधण्यासाठी भूखंड किंवा जमीन खरेदी करतात. जमीन खरेदी करताना नोंदणी करतात पण, अनेकदा एक महत्त्वाची प्रक्रिया पूर्ण करायला विसरतात, ज्यामुळे जमिनीवरील हक्क गमावण्याचा धोका होऊ शकतो. मालमत्ता किंवा घरांच्या रजिस्ट्री म्हणजे नोंदणीनंतर काही कागदपत्रे आवश्यक असतात. या कागदपत्रांशिवाय, तुम्ही जमिनीचे मालक होऊ शकणार नाही. म्हणून, मालमत्तेची मालकी मिळवण्यासाठी तुम्हाला एक महत्त्वाची प्रक्रिया करणे अनिवार्य आहे.
{customHtml-1}